पुढील 24 तास धोक्याचे! ‘या’ 7 जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट Marathwada Weather
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर…
खरीप हंगाम महाराष्ट्रातील बहुतेक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पावसावर आधारित शेती ही खरीप हंगामात सर्वाधिक केली जाते, त्यामुळे या हंगामात…
सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या उत्पादनावर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण…
राज्यात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला असून, 26 मे रोजी कोकण पट्टीत पावसाने दमदार सुरुवात केली होती. कोकण, मध्य महाराष्ट्र,…
सध्या महाराष्ट्रात हवामानात सतत बदल होत असून, मान्सूनच्या आगमनानंतर सुरुवातीच्या जोरदार पावसाने काही ठिकाणी दिलासा मिळाला, तर काही ठिकाणी चिंता…
जवळपास संपूर्ण मे महिन्यामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यातच यावर्षी मान्सूनने देखील कमालीचा वेग पकडला व तब्बल…
राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. अवकाळी व अनियमित पावसाच्या तडाख्यामुळे राज्यातील सुमारे…
जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न; बियाणे, खते, निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत आढावा मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री…
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना योग्य दराने व वेळेत खते बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. तसेच खते बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लिंकिंग न करता खते बियाणे उपलब्ध करून दिली पाहिजेत. लिंकिंग करणाऱ्या संबंधित विक्रेत्यावर प्रशासनाकडून तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश ग्रामविकास, पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राजू खरे, अभिजीत पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, उत्तम जानकर(ऑनलाईन), निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य संचालक विनायक दीक्षित, जिल्हा फर्टिलायझेशन असोसिएशनचे अध्यक्ष बालाजी चौगुले यांच्या सह सर्व उपविभागीय कषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की खरीप हंगात 2025 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक तेवढा खते व बियाण्याचा पुरवठा होईल यासाठी काटेकोर नियोजन करावे. खताची लिंकिंग होणार नाही यावर जिल्हाधिकारी यांनी लक्ष ठेवावे व जो कोणी लिंकिंग करेल त्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. लोकप्रतिनिधी यांनीही त्यांच्याकडे लिंकिंगबाबत तक्रार आल्यास तात्काळ जिल्हाधिकारी यांना कळवावे. लिंकिंग करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीची गय केली जाणार नाही असेही त्यांनी निर्देशित केले. कृषी विभागाने बोगस बियाणे व खते शेतकऱ्यांना पुरवठा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी त्यासाठी आवश्यक बियाणं व खतांचे परीक्षण करावे. सॅम्पल तपासणीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी. अशा बोगस खाते व बियाण्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खात्री करावी. खते विक्रेत्यांना शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल परंतु त्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही या अनुषंगाने निविष्ठांची विक्री करावी, असेही निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले. खरीप हंगाम 2024 अंतर्गत नुकसान भरपाई विम्याची 81 कोटीची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पुढील पंधरा दिवसात उपलब्ध करून द्यावी. कंपनीचे शासनाकडून 142 कोटीची रक्कम शासन स्तरावरून अदा होईलच परंतु विमा कंपनीने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई रक्कम अदा केली पाहिजे असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले. तसेच इन्शुरन्स कंपनीकडे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई नाकारली गेली आहे त्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पुढील आठ दिवसात उपलब्ध करून द्यावेत असेही त्यांनी निर्देशित केले.
नागपूर येथील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सप्टेंबर महिन्यात देखील सुरू राहणार…