पंजाब डख यांचा हवामान अंदाज

जवळपास संपूर्ण मे महिन्यामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यातच यावर्षी मान्सूनने देखील कमालीचा वेग पकडला व तब्बल दहा ते बारा दिवस आधी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले व त्यामुळे देखील पावसाचा जोर वाढला व बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर या सगळ्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले व फळबागांचे देखील नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

इतकेच नाही तर खरीप हंगाम तोंडावर आला असताना खरीप हंगामाची तयारी करायला देखील शेतकऱ्यांना या पावसाने वेळ दिला नाही. परंतु आता हवामान खात्याचा अंदाजानुसार जवळपास कालपासून राज्यात पावसाने ब्रेक घेतला आहे व त्यामुळे येत्या काही दिवसांपर्यंत तरी पावसाची उघडीप असणार असल्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे ही एक शेतीची तयारी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच प्रकारचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील व्यक्त केला आहे. नेमके पंजाब डख त्यांचा हवामान अंदाज व्यक्त करताना काय म्हटले? त्याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.

पंजाब डख यांचा ताजा हवामान अंदाज

प्रसिद्ध हवामान अभ्यासक आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव असलेले पंजाबराव डक यांनी त्यांचा ताजा हवामान अंदाज वर्तवला व तेव्हा त्यांनी म्हटले की, 31 मे म्हणजे आजपासून ते साधारणपणे 6 जून पर्यंत राज्यात जोराचे वारे वाहतील. परंतु या कालावधीत राज्यात मात्र पाऊस येणार नाही.तसेच पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी सल्ला देताना सांगितले की,या कालावधीत म्हणजेच 6 जून पर्यंत शेतीची जी काही कामे असतील ते करून घेणे खूप गरजेचे आहे. कारण संपूर्ण राज्यात 6,7,8,9 आणि 10 जून असे चार दिवस परत पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच या कालावधीत जो काही पाऊस होणार तो भाग बदलत पडणार असून 6 जूनपर्यंत मात्र राज्यात सगळीकडे हवामान कोरडे राहील असे त्यांनी म्हटले.

आज 31 मे पासून राज्यात जोराचे वारे सुटतील व एक तारखेपासून मात्र राज्यात सगळीकडे सूर्यदर्शन होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांसाठी मात्र त्यांनी सांगितले की,जवळपास बराच पाऊस झाला आहे त्यामुळे शेत तयार करणे जरा कठीण आहे. परंतु ज्या पद्धतीने तुम्हाला शेतीची तयारी करता येईल त्या पद्धतीने या कालावधीत शेतीची तयारी करणे खूप गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सहा जून नंतर जो काही पावसाला सुरुवात होईल तो पूर्व तसेच पश्चिम विदर्भ तसेच दक्षिण विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश तसेच मराठवाडा या सगळ्या विभागांमध्ये पडणार आहे असे त्यांनी म्हटले. जवळपास हा पाऊस 7 ते 10 जून दरम्यान पडेल असे त्यांनी म्हटले. परंतु आज पासून ते 6 जून पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहण्याचा त्यांचा हा अंदाज नक्की शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

पंजाब डख यांचा हा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी जवळपास या सहा दिवसात जी काही कामे असतील ते आटोपून घेणे खूप गरजेचे आहे. नाहीतर परत सात तारखे नंतर पावसाला सुरुवात होईल व त्यानंतर परत धावपळ उडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *