अजित पवारांची मोठी घोषणा! ऊस उत्पादक शेतकऱ्यांना AI साठी मिळणार थेट 25000 कर्ज

 राज्यातील ऊसशेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) वापरण्यासाठी आर्थिक…

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार

या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार २७ मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान ५ जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कृषी विभागाचा मोठा निर्णय: नुकसानभरपाई मर्यादा आता कमी

राज्यात अलीकडेच आलेल्या अवकाळी पावसामुळे, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून…

फळपिकांसाठी कव्हर, तण आच्छादन व हायड्रोपोनिक्ससाठी मिळतंय अनुदान; असा करा अर्ज?

 नव्या आर्थिक वर्षात, म्हणजेच सन २०२५-२६ साली, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या आणि फायदेशीर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये…

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २० कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, राज्यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेरीचा तगादा या तीन कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत दिली जाते. महसूल, कृषी, गृह आणि सहकार विभागामार्फत तपासणी करून ही मदत दिली जाते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत करण्यासाठी विभागीय आयुक्त तथा नियंत्रक अधिकारी, कोकण यांना १२ लाख, पुणे- एक कोटी सहा लाख, नाशिक- तीन कोटी ३९ लाख, छत्रपती संभाजीनगर- चार कोटी ९२ लाख, अमरावती- सहा कोटी ७६ लाख  आणि नागपूर विभागीय आयुक्त यांना तीन कोटी ७५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला हा २० कोटींचा निधी मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता  राज्यातील उर्वरीत जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यात येणार आहे. उणे प्राधिकार पत्रावर निधी आहरीत करण्यास मान्यता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसास तातडीने मदत देण्यासाठी सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात उणे प्राधिकार पत्रावर निधी आहरीत करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे निधी अभावी आणि निधी मागणी प्रस्ताव पाठवून त्यास शासनाची मंजुरी घेणे या कारणास्तव मदत देण्यासाठी होणारा विलंब टाळला जाणार असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनो मशागतीला लागा! आजपासून आठवडाभर राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधारा, पंजाबराव डख

राज्यात आजपासून आठवडाभर विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 17 मे पासून 25 मे पर्यंत पूर्वमोसमी पावसाचा जोर…

पावसाचा जोर वाढला, अनेक भागात वादळी वाऱ्यासह वरुणराजाची जोरदार हजेरी, काही भागात पिकांना फटका

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे. पण…

मान्सून वेळेआधीच! काय सांगतय हवामान खातं?

दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा कडाक्याच्या उकाड्यात जातो. यंदा मात्र अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह ढगाळ वातावरण अनुभवायला मिळतय . त्यामुळे, ‘यंदा मान्सून कधी दाखल होणार? ‘ हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.  सामान्यतः मे महिन्याच्या अखेरीस हवामानात बदल घडू लागतात – ढगाळ वातावरण तयार होते, विजा चमकतात आणि जोरदार वारे वाहू लागतात. हे सगळं पूर्वमोसमी पावसाची चाहूल देणारे संकेत असतात. मात्र, यंदा हे बदल मे च्या सुरुवातीलाच पाहायला मिळत आहेत. दरवर्षी अंदमान-निकोबार बेटांवर 18 ते 22 मेदरम्यान मान्सून दाखल होतो. परंतु यंदा मान्सून आठ ते दहा दिवस आधीच तिथे पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, 13 मे पर्यंत मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो. यामुळे केरळमध्येही मान्सून नेहमीपेक्षा लवकर पोहोचण्याची शक्यता आहे. जरी हवामान विभागाने केरळ आणि भारताच्या मुख्य भूमीवरील मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली, तरी काही अभ्यासकांचा अंदाज आहे की, जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा मेच्या अखेरीस महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. हवामान अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार, सध्या अंदमान-निकोबार भागात ढगांच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे, तसेच वाऱ्याचा वेगही सातत्याने बदलत आहे. यावरून मान्सून वेळे आधी पोहोचण्याची शक्यता बळकट होते. याशिवाय, समुद्रसपाटीवर हवेचा दाब तुलनेने जास्त असून, जमिनीवर दाब कमी असल्याने समुद्राकडून जमिनीकडे वाऱ्यांचा जोर वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या कडाक्यातही हवामानात अचानक बदल जाणवत आहेत.

केंद्र सरकारचा शेतकरी अन् कृषी क्षेत्रासाठी मोठा निर्णय, 13 हजार 960 कोटींच्या 7 योजनांना मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  कॅबिनेट बैठकीत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी मोठा…

सीताफळ झाडांची निगा कशी राखावी

महाराष्‍ट्रातील  हवामानाचा विचार करता, सिताफळाची लागवड होण्‍यास भरपूर वाव आहे. अत्‍यंत कोरडया रखरखीत व उष्‍ण हवामानाच्‍या प्रदेशापासून भारी पाऊसमानाच्‍या हवामाना…