बळीराजापुढं बनावट बियाण्यांचे संकट!
खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची (Farmer) फसवणूक होत असते. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढावण्याची शक्यता असल्याने ही…
खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची (Farmer) फसवणूक होत असते. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढावण्याची शक्यता असल्याने ही…
राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर…
राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पाऊस (Rain) जोरदार हजेरी लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं काही भागात शेतकऱ्यांना दिलासा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १२१ व्या भागात देशातील सर्व नागरिकांना सचेत ॲप डाउनलोड करायचं आवाहन केलं. हे…
राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी “आपले सरकार सेवा केंद्र” सुरू करण्यात आले आहे. आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढविणे व या केंद्रांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरवाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदन केले. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा,लाभ मिळविण्यासाठी लागणारा श्रम, निधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विहित मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या कमी असल्या कारणाने आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्याचे सुधारित निकष जाहीर केले आहेत. सुधारित निकष ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात -सेवा केंद्रांची संख्या – २, ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५हजार पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) – ४, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र – १२हजार ५०० लोकसंख्येसाठी – २, इतर महानगरपालिका व नगरपरिषद – १० हजार लोकसंख्येसाठी – २, प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात – २ ५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत – ४ असे असणार आहेत. सुधारित सेवा दर सेवा शुल्क सुधारित दर – ५० रुपये,राज्य सेतू केंद्राचा वाटा २.५ रू.(५%),महआयटीचा वाटा दर – १० रू. (२० %) जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा, दर – ५ रू. (१० %),आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा वाटा (VLE) दर – ३२.५० रू. (६५%) असे असणार आहेत. तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येत असून प्रत्येक घरपोच भेटीसाठी प्रति नोंदणी प्रत्येकी 100 रुपये (कर वगळून) एवढे सेवाशुल्क आकारण्यात येईल दर सेवाशुल्क संबंधित केंद्र चालकांद्वारे अर्जदारांकडून आकारण्यात येईल या शुल्काची विभागणी महा आयटीचा सेवा दर प्रत्येक ऑनलाईन सेवा बुकिंगसाठी २०% (एकूण दाराचा) वाटा, आपले सरकार सेवा केंद्रचालकासाठी सेवा दर घरपोच भेटीसाठी ८०% (एकूण दाराच्या) वाटा. वरील दर व्यतिरिक्त प्रती अर्ज फी ५० रुपये याप्रमाणे अर्जदारकडून सेवाशुल्क घेण्यात येणार असल्याचेही श्री.शेलार यांनी सांगितले.
राज्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे.सकाळी व सायंकाळी थोडासा गारवातर दिवसाचे सर्वसाधारणतापमान ३५ ते ३८ ०अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले आहे.दिवसागणिक तापमानात वाढ होतांना दिसत आहे.राज्यात गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात सर्वसाधारणपणे ४२ ते ४५०अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे.गेल्या वर्षी बहुतांश ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी विशेतः अवर्षणप्रवण क्षेत्रात पाण्याचे मोठ्या दुर्भिक्ष असल्याने फळबागा व जित्राब जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यास पडला आहे. प्रस्तुत लेखात येत्या उन्हाळी हंगामात फळबागा जगवायच्या कशा यावर उहापोह केला आहे. राज्यातील काही भागात कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम फळबागेवर होत असतो.सूर्यप्रकाश,गरम वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर तसेच फळे देणाऱ्या झाडांवर होत असतो. यामुळे मुख्यत्वे कोवळी फुट करपणे,खोड तडकणे,फळगळ होणे,फळांचा आकार लहान होणे,सर्व पाने ,फळे गळून झाडे वाळून जाणे,झाडांची वाढ थांबणे आणि शेवटी झाड मरणे असे प्रकार होतात याकरिता पाण्याचा आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर उन्हापासून बचाव करण्या करिता करावयास हवा. उन्हाळ्यामध्ये शक्यतो ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार पाणी द्यावे. या पद्धती दुष्काळी क्षेत्रामधे किंवा पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्राकरिता अत्यंत फायदेशीर आहेत.या पद्धतीत इतर प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के पाण्याची बचत होते व उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ मिळू शकते.या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी मोजून देता येते व पाण्याचा अपव्यय होत नाही. पाण्याबरोबर खतेदेता येतात,त्यामुळे खताच्या खर्चात बचत होते. फळबागेस/पिकास पाणी सकाळी अथवा रात्री दिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात एक आड एक सरीने पाणी द्यावे. तसेच पाणी देण्याच्या पाळीत (अंतरात) वाढ करावी. उदाहणार्थ एखाद्या बागेस १० दिवसाच्या अंतराने पाणी देत असाल तर पुढील पाणी १२ दिवसाने,त्यापुढील पाणी १५ दिवसाने अशा प्रकारे जमिनीचा मगदूर,तापमान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी. कमी क्षेत्रातील व जास्त अंतरावरील फळझाडांना ही पाणी देण्याची पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.या पद्धतीत लहान झाडांना साधारणता दोनते तीन वर्षाकरिता ५ ते ७ लिटर पाणी बसणारी लहान मडकी वापरावीत व जास्त वयाच्या मोठ्या झाडांकरिता १० ते १५ लिटर पाणी बसेल अशी मडकी वापरावीत.मडकी शक्यतो जादा छिद्रांकीत किंवाआढीत कमी भाजलेली असावीत. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे व त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी.प्रत्येक झाडास दोन मडकी जमिनीत खड्डा खोडून बसवावीत व त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे.मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी.त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही.या पद्धतीमुळे ७०- ७५ टक्के पाण्याची बचत होते. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.त्यामुळे दरवर्षी पाणी टंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येत घट झाली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता कमी असली तरी शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील ५६ तालुक्यातील सुमारे ६१० गावातील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खोल गेली असल्याचे आढळून आले आहे.त्यापैकी अवघ्या ७३ गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश परिस्थिती भासणार असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचे अधिक उत्सर्जन होते.आच्छादनांचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो.त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते.आच्छादनाकरिता पालापाचोळा,वाळलेले गवत,लाकडी भूसा,उसाचे पाचट,गव्हाचे काड,भाताचे तुस अशा सेंद्रिय संसाधनांचा वापर करावा.सेंद्रिय आच्छादनाची जाडी १२ ते १५ से.मी असावी. सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादने वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. सध्या आच्छादनासाठी पॉलिथीन फिल्मचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.आच्छादनामुळेसूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तणांची वाढ होत नाही,तसेच जमिनीचे तापमान नियंत्रित राहते.जमिनीत उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.सेंद्रिय पदार्थांचे आच्छादनअसेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. आच्छादनांमुळे जमिनीची धूप कमी होते तसेच जमिनीस भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनामुळे दिलेल्या खताचा जास्त कार्यक्षमरित्या उपयोग करून घेता येतो.आच्छादने वापरण्यापूर्वी जमिनीवर कार्बारील्भुकटी टाकून घ्यावी म्हणजे वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही.आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळ्यातील कालावधी/अंतर वाढविता येतो. आच्छादनांमुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते. फळझाडांनी जमिनीमधून शोषलेल्या एकूण पाण्यापैकी ९५ टक्के पाणी वनस्पती पर्णोत्सर्जनाद्वारे हवेत सोडतात.हे वाया जाणारे पाणी बाष्परोधकाचा वापर करून अडविता येते.बाष्परोधके हि दोन प्रकारची असतात. पर्ण्ररंध्रेबंद करणारी उदा. फिनील मरक्यूरी अॅसिटेट(Phenyal mercury acetate), अॅबसिसिक अॅसिड व पानावर पातळ थर तयार करणारी उदा. केओलीन,सिलिकॅान ऑईल,मेंण इत्यादी.उन्हाळ्यातील पाणीटंचाईस तोंड देण्यासाठी बाष्पच्छादनाबरोबर, बाष्परोधकाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते.उन्हाळ्यात ६ ते ८ टक्के(६०० ते ८०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) तीव्रतेचे केओलीन फवारे २१ दिवसाच्या अंतराने किमान २ ते ३ वेळा करावेत किंवा पी.एम ए (फिनील मरक्यूरी अॅसिटेट) या बाष्परोधकाचे ८०० मिलीग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या फळझाडांना पहिल्या एक–दोन वर्ष कडक उन्हापासून सरंक्षण देण्यासाठी सावली करावी.झाडाच्या दोन्ही बाजूंना ३ फुट लांबीचे बांबू रोवावेत.या बाबूंना चारही बाजूने व मधून तिरकस असे बांबू किंवा कामट्या बांध्याव्यात. त्यावर वाळलेले गवत अंथरावे.या गवतावरून तिरकस काड्या सुतळीने व्यवस्थित बांध्याव्यात.वाळलेल्या गवता एैवजी बारदाना किंवा शेडनेट चा वापर करावा. उन्हाळ्यात वाऱ्याची गती १८ ते २० कि. मी. प्रति तास असल्यास जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते.बागेभोवती अगदी सुरुवातीलाच शेवरी,मलबेरी,चिलार,विलायती चिंच,सुबाभूळ, ग्लिरीसीडीया, सुरु,शेर,निवडुंग यापैकी उपलब्ध वनस्पतींची कुपंणां करिता लागवड करावी.अशा कुंपणामुळे वारा वादळाचा बागेला त्रास होत नाही.गरम वाऱ्यापासून फळबागांचे सरक्षण होते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.बागेस कमी प्रमाणात पाणी लागते. उन्हाळी हंगामात बाष्पीभवन व पर्णोत्सर्जनाचा वेग जास्त असल्यामुळे फळझाडांची पाने कोमजतात.पानांचे तापमान वाढते व पानातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पानातील अन्नांश तयार होण्याची क्रिया मंदावते.अशा वेळी १ ते १.५ टक्के (१०० ते १५० ग्रॅम १० लिटर पाणी) पोटॅशियम नायट्रेट (KNO3)आणि २ टक्के विद्राव्य डायअमोनियम फॉसपेट (DAP)(२०० ग्रॅम १० लिटर पाणी)यांची २५-३० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.यामुळे पानातील अन्नांश तयार होण्याची क्रिया गतिमान होते व झाडे जमिनीतील ओलावा शोषण्यास सुरुवात करतात. उन्हामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास झाडांच्या खोडावरील साली तडकण्याचे प्रमाण वाढू शकते.अशावेळी झाडांचे बुरशीजन्य व इतर रोगांपासून सरंक्षण करण्याच्या दृष्टीने खोडांना बोर्डोपेस्ट लावणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे १ ते २ मीटर उंची पर्यंत चुन्याची पेस्ट किंवा बोर्डो पेस्ट लावावी. बोर्डो पेस्ट लावण्याने सूर्यकिरण परावर्तीत होतात,खोडाचे तापमान कमी राहते,साल तडकत नाही. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असेल तर आंबे बहार अगर हस्त बहार न धरता मृग बहार धरावा.कारण मृग बहार धरल्यास पावसाळ्यात पावसाचे पाणी मिळते आणि थोडे फार वरचे पाणी देऊन भर घेता येतो.मात्र आंबे बहार धरल्यास बर उन्हाळ्यात पाणी दयावे लागते ते पाण्याच्या कमतरतेमुळे शक्य होत नाही,पाण्याची कमतरता असल्यास डाळिंब,संत्री, मोसंबी,पेरू यांचा मृग बहार धरावा.वरील सर्व उपाय योजना अंमलात आणून फळ बागायतदारांनी फळझाडांचे संरक्षण करावे. उन्हाळी हंगामामध्ये जमिनीतील उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उन्हापासून फळझाडांचे सरंक्षण करण्यासाठी वरील उपाययोजना कराव्यात.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कधी ढगाळ कधी कोरडे हवामान राहिल्याने तापमानात चढउतार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार…
सध्या राज्यात पावासाचा (Rain) जोर कमी झाला आहे. अनेक भागात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातला होता. पण आजपासून राज्यात…
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला (Krishi Solar Pump Yojana) शेतकऱ्यांचा (Farmers) मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज…
भारतातील कांद्याचे वाढते (Onion Price) दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं अफगाणिस्तानातून (Afghanistan) कांद्याची आयात केली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद…