देशात अनेक संकटांनी शेतकरी भरडला जातो आहे.अनेकदा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याची पाहायला मिळते. एकीकडे प्रचंड उत्पादन खर्च आणि दुसरीकडे उत्पादित शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत.त्यात आता हऱभरा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
सद्या हरभऱ्याच्या दरात मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे.त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे .सद्या हरभऱ्याच्या स्पॉट अकोला किमती या सप्ताहात ४.९ टक्क्यांनी वाढून रु. ५,९०० वर आल्या आहेत.आता सद्या हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.