राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा (unseasonal rains) मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 22 हजार 233 हेक्टरील क्षेत्र अवकाळी पावसामुळं बाधित झालं आहे.
‘या’ जिल्ह्यांना बसला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका
मका, ज्वारी,भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान अवकाळी पावसामुळं झालं आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना बसला आहे.
मे महिन्यात राज्यात अनेक जिल्ह्यांत गेल्या वादळी-वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, बाजरी, मका, हळद, कांदा, टोमॅटो, वाटाणा, चारा यांसह आंबा, काजू, डाळिंब, द्राक्ष, टरबूज, संत्रा. पपई, पेरू या फळपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागात शेती पिकांबरोबरच घरांचे देखील नुकसान झाले होते. तसेच काही ठिकाणी वीड पडून लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत तसेच वीज पडून जनावरे देखील दगावली आहेत.
मान्सून केरळमध्ये दाखल
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. अशातच आता सर्वांसाठी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मान्सून (Monsoon) अखेर केरळमध्ये (Kerala) दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. तर मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची मागिती देखील हवामान विभागानं दिली आहे.