थंडीचा कडाका वाढला

राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. सकाळी गारठा वाढला आहे. तर उत्तर भारतातील अनेक भागात थंडीची लाट कायम आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम ऱाहू शकते,असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील बहुतांशी भागात आज थंडीचा कडाका वाढला होता. अनेक भागात किमान तापमानात घट झाल्याचे दिसते. कमाल तापमानातही घटीची नोंद झाली. राज्यातील किमान तापमान पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज आहे.

तर काही भागात किमान तापमानातील घट आणखी जाणवू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. उत्तर भरतातील बहुतांशी भागात थंडीची लाट कायम आहे. पंजाबच्या बहुतांशी भागात तर हरियाना आणि पंजाबच्या काही भागात किमान तापमान २ ते ५ अंशाच्या दरम्यान होते.

तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि उत्तर छत्तीसगडच्या बहुतांशी भागात किमान तापमान ६ ते १० अंशाच्या दरम्यान राहील्याच्या नोंदी हवामान विभागाच्या आहेत. पंजाबमधील अमृतसर येथे देशातील सर्वात निचांकी २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *